माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या, खास जनता दरबाराचे आयोजन
परळीतील 'जगमित्र'च्या कार्यालयात साधला नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद

ग्रामराज्य वृत्तसेवा, पुणे
परळी , दि. १२ एप्रिल २०२५ :- राज्याचे माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी शनिवारी (दि.१२ एप्रिल) त्यांच्या परळी विधानसभा मतदारसंघातील नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी मुंडे यांनी नागरिकांच्या समस्या, कार्यकर्त्यांच्या तक्रारी आणि पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि तत्काळ मार्गी लागू शकणारे प्रश्न जागच्या जागी मार्गी लावले.
नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी धनंजय मुंडे यांनी शनिवारी परळीतील 'जगमित्र' कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन केले होते.यावेळी परळी विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम समाजातील नागरिकांसह समाजातील विविध वर्गातील नागरिकांनी मुंडे यांचा सत्कार केला. आजारपणामुळे गेल्या काही महिन्यांपासून त्यांना नागरिकांशी संवाद साधता आला नव्हता. याआधीचा जनता दरबार जानेवारी २०२५ मध्ये घेण्यात आला. दरम्यान, त्यांना आजारपणामुळे मागील तीन महिने जनता दरबार घेता आला नव्हता.