राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे जीवन म्हणजे धैर्य,श्रद्धा,न्याय व सेवा यांचा संगम,जालिंदर कामठे 

वसंतदादा पाटील प्रतिष्ठानतर्फे अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन 

राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे जीवन म्हणजे धैर्य,श्रद्धा,न्याय व सेवा यांचा संगम,जालिंदर कामठे 
पुणे :- पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करताना भाजपचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष जालिंदर कामठे व अन्य

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ३१ मे २०२५ :-  राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे जीवन म्हणजे धैर्य, श्रद्धा, न्याय व सेवा यांचा संगम असल्याचे प्रतिपादन वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी शनिवारी (दि. ३१मे) येथे बोलताना केले.

वसंतदादा पाटील प्रतिष्ठानतर्फे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी अहिल्याबाई होळकर यांना ३०० व्या  जयंतीनिमित्त हिवरे येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, "अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी झाला. त्यांनी  भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदी घाट बांधले. लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखले. त्यांनी जनतेसाठी अनेक कल्याणकारी कामे केली. जलसंधारणाची कामे, गरीब आणि गरजूंसाठी मदतीचे हात पुढे करण्याचे काम त्यांनी अखंडपणे केले. त्यांची जयंती ही केवळ एक सण नसून प्रेरणादायी वाटचाल सुरू ठेवण्याची आठवण आहे."

यावेळी चांबळी केंद्राचे केंद्रप्रमुख प्रताप मेमाणे, शिक्षक नेते तानाजी फडतरे, हिवरेच्या सरपंच पूनम कामठे, सामाजिक कार्यकर्ते शब्बीर शेख, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन कुदळे, नंदू गायकवाड, पुरुषोत्तम  तिवटे, शंकर कुदळे, चंद्रशेखर गुरव, संदीप चाचर, वैशाली पवार, मेघा गायकवाड, स्वाती बोरकर, स्मिता बोराटे आदी उपस्थित होते.

दरम्यान, कामठे यांच्या हस्ते कोंढवा बुद्रुक प्रतिभाताई पवार माध्यमिक विद्यालयातही अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.‌ यावेळी प्राचार्य भानुदास रिठे, मुख्याध्यापिका सुरेखा कोलते, पर्यवेक्षक हेमंत जाधव, रवी क्षीरसागर, संभाजी साबळे, सुधाकर शिळीमकर, पुष्पा झेंडे, हर्षदा शेलार, वैशाली वाघमारे, वैशाली देवरे, सुवर्णा कांबळे आदी उपस्थित होते.