'स्वच्छ भारत, सुंदर भारत' घोषणा देत बोपदेवमधील कानिफनाथ मंदिर व परिसराची स्वच्छता!

भाजपचे नेते जालिंदर कामठे यांचा पुढाकार : अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान 

'स्वच्छ भारत, सुंदर भारत' घोषणा देत बोपदेवमधील कानिफनाथ मंदिर व परिसराची स्वच्छता!
पुणे:- पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त कानिफनाथ मंदिर व परिसराची स्वच्छता करताना भाजपचे नेते जालिंदर कामठे व अन्य पदाधिकारी.
'स्वच्छ भारत, सुंदर भारत' घोषणा देत बोपदेवमधील कानिफनाथ मंदिर व परिसराची स्वच्छता!

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २९ मे २०२५ :-  पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष जालिंदर कामठे, पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे, माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि.२९ मे) स्वच्छता अभियान राबविण्यात आले. 'स्वच्छ भारत, सुंदर भारत' अशा घोषणा देत पुरंदर तालुक्यातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. यानिमित्ताने पुरंदर तालुक्यातील बोपदेव येथील कानिफनाथ मंदिर व परिसराची स्वच्छता करण्यात आली. 

पुरंदर तालुका भाजपच्या वतीने अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त या स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. अभियानाच्या प्रारंभी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कानिफनाथ मंदिर व परिसराची स्वच्छता करण्यात आली.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी लोकहितासाठी आयुष्य वेचले. त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपण सर्वांनी सामाजिक कार्यात पुढाकार घेतला पाहिजे. स्वच्छता ही केवळ एक दिवसीय बाब नसून, ती आपल्या दिनचर्येचा भाग असली पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी यावेळी बोलताना केले.

स्वच्छता हा विषय नागरिकांच्या थेट आरोग्याशी निगडित आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःचे आरोग्य जपण्यासाठी स्कावच्यछतेबाबत कायम जागृत राहिले पाहिजे. यासाठी नागरिकांनी लोकसहभागातून सातत्याने स्वच्छता अभियान अंतर्गत आपापल्या गावाची व परिसराची स्वच्छता केली पाहिजे, असे मत माजी आमदार अशोक टेकवडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

या कार्यक्रमाला पंचायत समितीचे माजी उपसभापती निलेश जगताप, भाजपचे पश्चिम पुरंदर अध्यक्ष संदीप कटके, पुरंदर भाजप सरचिटणीस गणेश मेमाणे, बाळासाहेब काळाणे, सुदर्शन कुदळे, दयानंद फडतरे, संभाजी फडतरे, समीर तरवडे, हेमंत कुंभार, योगेश जगदाळे, दादा फडतरे, मनोज घिसरे, किरण कटके, सुनील गोफणे, तुकाराम कटके, हनुमंत साळुंखे, समीर भिसे, ईश्वर कटके, तानाजी फडतरे, रमेश फडतरे, दीपक फडतरे, माऊली फडतरे, योगेश कटके, संभाजी फडतरे, वसंत शंकर फडतरे, मारुती फडतरे आदींसह पक्षाचे सर्व पदाधिकारी, स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन भाजपचे युवा मोर्चाचे पुरंदर तालुका अध्यक्ष दिलीप सदाशिव कटके आणि संभाजी फडतरे यांनी केले.