'ग्रामगौरव'चे विवेक ठाकरे यांचा गगनभरारी समर्थ पुरस्काराने सन्मान!

खडतर परिस्थितीत चमकदार कामगिरीमुळे गौरव : 'गगनभरारी' पुस्तक प्रकाशित 

'ग्रामगौरव'चे विवेक ठाकरे यांचा गगनभरारी समर्थ पुरस्काराने सन्मान!
पुणे:- 'ग्रामगौरव'चे विवेक ठाकरे यांना पुरस्कार प्रदान करताना राजेश पांडे , विद्याधर ताठे, दीपक मोकाशी व अन्य.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १२ मे २०२५ :-  ग्रामगौरव मीडिया फाउंडेशनचे संस्थापक संपादक विवेक ठाकरे यांचा 'गगनभरारी सन्मान -२०२५' या पुरस्काराने गौरव करण्यात आला. 

यावेळी ज्येष्ठ संपादक व पत्रकार विद्याधर ताठे, उद्योजक दीपक मोकाशी आणि सेवानिवृत्त प्राचार्य अनिल कुलकर्णी यांच्या हस्ते विवेक ठाकरे यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे बुक फेस्टिवलचे संयोजक आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे हे होते.

अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये कर्तुत्ववान म्हणून आपापल्या क्षेत्रात ठसा उमटविलेल्या विविध क्षेत्रातील २० जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये यशस्वी साखर कारखानदार भाऊसाहेब आव्हाळे,  सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी लालासाहेब जाधव, डॉ.योगेश देशमुख,गिरीश खेर, सनदी लेखापाल शंकर अंदानी, रत्नप्रभा बेल्हेकर,हिंदुराव पवार, रजनी घोरपडे, डॉ.अनिल धनगर, योगिता सपकाळ आदींचा यामध्ये समावेश आहे.

या समारंभात समर्थ फाउंडेशनचे किरण इनामदार आणि वल्लरी मीडिया यांनी पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या सर्वांच्या दैदीप्यमान प्रवासाची संघर्षगाथा उलगडणारे 'गगनभरारी' हे पुस्तक  प्रकाशित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वल्लरी मीडियाचे संपादक व्यंकटेश कल्याणकर यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन ज्योती इनामदार, श्रद्धा जगदाळे, डॉ.रवी आचार्य, गणेश चप्पलवार, जगन्नाथ कुलकर्णी,सचिन गोंगटल्लू यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील धनगर व प्रज्ञा कल्याणकर यांनी केले.मानसी चिटणीस यांनी आभार मानले.