Crop damage due to unseasonal rains :- पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्या : जालिंदर कामठे
पुरंदर तहसीलदारांना निवेदन : तत्काळ पंचनामे करण्याची कामठे यांची मागणी

ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २७ मे २०२५ :- पुणे जिल्ह्यात मागील तीन आठवड्यापासून अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळे पुरंदर किल्ला शेतकऱ्यांच्या फळबागा, कांदा आणि भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी आणि यासाठी नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी भाजपचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पुरंदर तालुक्यामध्ये मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. मे महिन्यात उच्चांकी पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांची झालेली हानी भरून काढण्यासाठी सरकारच्या वतीने लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी कामठे यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान, या मागणीसाठी जालिंदर कामठे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने तहसीलदार विक्रम राजपूत यांच्याशी चर्चा केली. या शिष्टमंडळात भानू जगताप,संतोष जगताप, संदीप देवकर,शिवाजी साळुंके,सचिन पठारे, गणेश जाधव, नदीम इनामदार आदी उपस्थित होते.