लेखक व्हायचंय,तर मग उचला पेन,लिहा मराठी वाङमय ; कथा, कविता, ललित, वैचारिक, संशोधनपर लेख, प्रवासवर्णन लिहिता येणार!

नवलेखकांना साहित्य लिखाणाची संधी :  ग्रामराज्य सुरू करणार 'मुक्त व्यासपीठ' हे खास सदर.

लेखक व्हायचंय,तर मग उचला पेन,लिहा मराठी वाङमय ; कथा, कविता, ललित, वैचारिक, संशोधनपर लेख, प्रवासवर्णन लिहिता येणार!
पुणे:- नवीन लेखनासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारे ग्राम राज्याचे खास सदर 'मुक्त व्यासपीठ'.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ७ एप्रिल २०२५ :-  महाराष्ट्रात अल्पावधीतच वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या ग्रामराज्य न्यूज पोर्टलने नवीन लेखकांचे मराठी साहित्य प्रसिद्ध करावे, अशी मागणी महाराष्ट्रातील अनेक नवलेखकांनी विशेषतः शिक्षकांनी केली आहे.

यामुळे नवलेखकांना त्यांचे मराठी साहित्य (उदा. कथा, कविता, ललित लेख, वैचारिक व संशोधनपर लेख, प्रवासवर्णन, यशकथा, गीत, अभंग, भारुड, गवळण आदींसह विविध मराठी साहित्य प्रकार)  ऑनलाईन प्रसिद्ध करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळू शकेल, अशी भावना राज्यभरातील नवलेखकांनी 'ग्रामराज्य'कडे व्यक्त केली आहे.

राज्यातील नवलेखकांच्या मागणीनुसार 'ग्रामराज्य'ने उदयोन्मुख मराठी साहित्यिक, लेखक, कवी, संशोधक, शिक्षक, अधिव्याख्याते, नाट्य व चित्रपट कलावंत आदींसह मराठी साहित्य लेखनात रुची असणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तींसह समाजातील सर्वांना साहित्य लेखनासाठी त्यांच्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा निर्णय 'ग्रामराज्य'ने घेतला आहे. 

यासाठी ग्रामराज्य हे मराठी न्यूज पोर्टल खास करून नवलेखकांसाठी मराठी साहित्य लेखनासाठी 'मुक्त व्यासपीठ' हे अनोखे सदर सुरू करत आहे. आपण सर्वांनी आतापर्यंत 'ग्रामराज्य' उत्तम प्रतिसाद दिला आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यांमुळे अवघ्या तीन आठवड्यात दररोजचे नियमित १८ हजार वाचक झाले आहेत. या संकेतस्थळाला भेट देणाऱ्यांची (व्हिवर्स) संख्या ३२ हजारांवर गेली आहे.