राजर्षी शाहू महाराजांचे  बहुजन समाजासाठी शिक्षण, आरक्षण व सामाजिक न्यायात मोठे योगदान!

भाजपचे नेते जालिंदर कामठे यांचे प्रतिपादन : पुण्यतिथीनिमित्त शाहू महाराजांना विनम्र अभिवादन 

राजर्षी शाहू महाराजांचे  बहुजन समाजासाठी शिक्षण, आरक्षण व सामाजिक न्यायात मोठे योगदान!
पुणे:- राजर्षी शाहू महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करताना भाजपचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष जालिंदर कामठे.

प्रा. मीरा बडे-सांगळे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ६ मे २०२५ :-  राजर्षी शाहू महाराज हे प्रगतिशील राजे आणि समाजसुधारक होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात बहुजन समाजासाठी शिक्षण, आरक्षण आणि सामाजिक न्यायासाठी मोठे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी मंगळवारी (दि.६ मे) येथे बोलताना व्यक्त केले. 

वसंतदादा पाटील प्रतिष्ठानतर्फे संस्थापक अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेस त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी कामठे बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. प्रमोद बोत्रे, मुख्याध्यापिका सुरेखा कोलते, प्रा.दत्ता चव्हाण दीपक कांबळे, सोनाली घोलप, नीलम गोयल सुवर्णा कांबळे, विजय डोईफोडे, सूर्यकांत गायकवाड, राकेश कांबळे, नीता खैरे, जितेंद्र जगताप आदी उपस्थित होते.

कामठे पुढे म्हणाले, "राजर्षी शाहू महाराज यांनी केलेल्या समाजसुधारणांध्ये  आरक्षण, शाळांची स्थापना, अस्पृश्यता निर्मूलन आदी महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश आहे. आजच्या काळात त्यांच्या विचारांची फार महत्वपूर्ण आहे. राजर्षी शाहू महाराज यांना खऱ्या अर्थाने समाजसुधारणेचे प्रणेते मानले जाते."