राजश्री शाहू महाराजांनी भारतीय लोकशाहीच्या मूल्यांचा पाया रचला!
भाजपचे नेते जालिंदर कामठे : शाहू महाराजांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २६ जून २०२५ :- राजश्री छत्रपती शाहू महाराज हे भारतीय लोकशाहीच्या मुल्यांचा पाया रचणारे राजे आहेत. छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक समतेचा पुरस्कार करत शिक्षण, सामाजिक आरक्षण आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्य केले. त्यामुळे शाहू महाराज हे केवळ इतिहासातील व्यक्तिमत्त्व नसून समाजाला आजही त्यांच्या विचारांची गरज आहे. त्यांनी घालून दिलेल्या मूल्यांप्रमाणेच समाज घडवणे हीच खरी त्यांना आदरांजली आहे, असे प्रतिपादन भाजपचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी येथे व्यक्त केले.
वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी जयंतीनिमित्त राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत, त्यांना विनम्र अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य भानुदास रिठे, मुख्याध्यापिका सुरेखा कोलते, पर्यवेक्षक हेमंत जाधव, ज्ञानदेव गायकवाड, शिरीष चाचर,विजय पितांबरे, नितीन देवरे,संदीप खिरीड, सुनील काकडे,वैशाली सोमवंशी, वैशाली भेसके, वैशाली वाघमारे, स्वाती डहाळे,शंकर बांगर, विकास मोरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंभर बांगर यांनी केले.पर्यवेक्षक हेमंत जाधव यांनी आभार मानले.
हिवरे येथील गुरुवर्य नारायण महाराज माध्यमिक विद्यालयात शाहू महाराज यांची जयंती साजरी
दरम्यान, पुरंदर तालुक्यातील हिवरे येथील गुरुवर्य नारायण महाराज माध्यमिक विद्यालयात शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भाजपचे नेते आणि वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी हिवरे गावच्या सरपंच पूनम कामठे, माजी सरपंच रमेश कुदळे, सामाजिक कार्यकर्ते शब्बी शेख, मुख्याध्यापिका सुनीता रायडू, चंद्रशेखर गुरव,रोहिणी गायकवाड, दत्तात्रेय गायकवाड, विकास भोसले, संजय शेडगे, संदीप चाचर,वैशाली पवार,मेघा गायकवाड, स्वाती बोरकर आदी उपस्थित होते.