पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक योजना व विकासकामांच्या माध्यमातून उमटविला कामाचा ठसा!
भाजप नेते जालींदर कामठे : संकल्प ते सिद्धी तक व प्रतिष्ठित नागरिक सन्मान आणि मेळाव्याचे आयोजन

ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १६ जून २०२५ :- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात विविध ऐतिहासिक योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. शिवाय त्यांनी देशाच्या विकासासाठी आवश्यक अशा विकासकामांच्या माध्यमातून ठसा उमटविला आहे, असे प्रतिपादन भाजपचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी येथे बोलताना केले.
भाजपच्या हवेली, फुरसुंगी, उरुळी देवाची मंडल च्यावतीने विकसित भारताचा अमृतकाळ, सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची अकरा वर्ष, विकसित भारतासाठी समर्पित नरेंद्र मोदी सरकारची 11 वर्ष या संकल्पनेवर आधारित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आंबेगाव बुद्रुक येथे संकल्प सिद्धी अभियान घेण्यात आले. यावेळी या अभियानाच्या माध्यमातून संकल्प ते सिद्धी तक व प्रतिष्ठित नागरिक सन्मान आणि मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या अभियानाच्या कार्यक्रमप्रसंगी जालींदर कामठे बोलत होते. या कार्यक्रमासाठी पुरंदर- हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे, पुणे जिल्हा अध्यक्ष शेखर वडणे, पुणे जिल्हा महिला अध्यक्ष स्नेहल दगडे, पुणे जिल्हा सरचिटणीस वैशाली सणस, मध्य हवेली मंडल अध्यक्ष संदीप बेलदरे, फुरसुंगी व उरुळी देवाची मंडल अध्यक्ष राहुल हरपळे, पांडुरंग रोडे, अभिजीत हरपळे, संतोष हरपळे, सचिन लंबाते, जगन्नाथ लांडगे, सचिन शितोळे आकाश पवार, सुधीर नवघुणे, सुनील झागडे प्रथमेश जगताप,संतोष चाकोरे, ऋषिकेश मुळे, संदीप कटके, आनंद जगताप, काका निगडे आदींसह भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना जालिंदर कामठे म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून विविध महत्त्वकांक्षी योजना राबविल्या आहेत. त्यांच्या ११ वर्षाच्या कालखंडातील जनतेच्या हितासाठी घेण्यात आलेल्या महत्वकांक्षी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी, या हेतूने या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. या कालखंडात भारतीय जनतेसाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना, धोरणात्मक निर्णय आणि सर्वसमावेशक विकासकार्ये राबविण्यात आली आहेत. २०१४ पासून आजपर्यंत देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि तंत्रज्ञानिक क्षेत्रात ऐतिहासिक बदल घडवून आणणाऱ्या या सरकारच्या कार्यकाळाची दखल देशभर घेतली जात आहे. या प्रमुख योजनांमुळे भारतीय जनतेच्या जीवनमानात सकारात्मक परिवर्तन घडवून आणले गेले आहे."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या महत्वकांक्षी योजनांमध्ये प्रामुख्याने स्वच्छ भारत अभियान, उज्ज्वला गॅस योजना, जनधन योजना, आयुष्मान भारत, योजना पंतप्रधान आवास योजना, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया आदींचा समावेश आहे. याशिवाय गतीशक्ती योजनेअंतर्गत पायाभूत सुविधा क्षेत्रात वेगाने प्रकल्प पूर्ण करण्यात येत आहेत. महामार्ग, रेल्वे, मेट्रो, विमानतळांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना दरवर्षी शेतकऱ्यांना थेट खात्यावर आर्थिक मदत दिली जात आहे.याव्यतिरिक्त, कोरोना काळातील प्रभावी व्यवस्थापन, लसीकरण मोहीम, 'वन नेशन वन रेशन कार्ड' योजना, तसेच विविध क्षेत्रांतील सुधारणांमुळे भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपली ओळख निर्माण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास" या मंत्रावर आधारित विकासाचा दृष्टिकोन निर्माण केला असल्याचे कामठे यांनी यावेळी सांगितले.