छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान आजही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे प्रतीक : जालिंदर कामठे यांचे प्रतिपादन
स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

प्रा. मीरा बडे-सांगळे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १४ मे २०२५ :- छत्रपती संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. त्यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी झाला.ते अत्यंत शूर, बुद्धिमान व संस्कृतसह अनेक भाषांतील विद्वान होते. संभाजी महाराजांनी औरंगजेबाविरुद्ध प्रखर लढा दिला. त्यांनी मर्यादित संसाधनांमध्ये मुघल साम्राज्याला जबरदस्त टक्कर दिली. ते क्रूर अत्याचारांना न डगमगता धर्मासाठी आणि स्वाभिमानासाठी शहीद झाले. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज हे खरे अर्थाने स्वराज्यरक्षक होते आणि त्यांचे बलिदान आजही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे प्रतीक मानले जाते, असे प्रतिपादन वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी बुधवारी (दि.१४ मे) केले.
वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्यावतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त हिवरे (ता. पुरंदर) येथील गुरुवर्य नारायण महाराज माध्यमिक विद्यालयात आणि कोंढवा बुद्रुक (ता. हवेली) येथील प्रतिभाताई पवार माध्यमिक विद्यालयात वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.त्यावेळी कामठे बोलत होते.
हिवरे (ता. पुरंदर) येथील कार्यक्रमाला उपसरपंच रामदास कुदळे, माजी उपसरपंच धर्माजी गायकवाड, सुदर्शन कुदळे, राजेंद्र जाधव, शांताराम दळवी, मुख्याध्यापक प्रशांत कदम, सुनिता रायडू, चंद्रशेखर गुरव, संजय शेडगे, दत्तात्रेय गायकवाड, रोहिणी गायकवाड, विकास भोसले, संदीप चाचर, वैशाली पवार, स्मिता बोराटे, मेघा गायकवाड आणि स्वाती बोरकर आदी उपस्थित होते.
कोंढवा बुद्रुक येथील कार्यक्रमाला हेमंत जाधव, संदीप खिरीड, शिरीष चाचर, ज्ञानदेव गायकवाड, शंकर बांगर, सुनील काकडे, सुधाकर शिळीमकर, मुख्याध्यापिका सुरेखा कोलते, वैशाली सोमवंशी पुष्पा झेंडे, सुनीता जाधव, नीता शिंदे, वैशाली भेसके ,स्वाती डहाळे, आरती खलाटे, प्रतिमा केदार आदी उपस्थित होते.